बेळगावजवळ वंटमुरी घाटात तिहेरी अपघात, दोन ठार
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव जवळ वंटमुरी घाटात तिहेरी अपघात झाला असून त्यात दोघेजण ठार झाले आहेत. या तिहेरी अपघातात कंटेनरचा पाठीमागील सांगाडा कांदावाहू ट्रकवर आदळला. तर समोरील इंजिन दुसऱ्या वाहनावर जाऊन आढळले. ज्या वाहनावर कंटेनरचा पाठीमागील सांगाडा आदळला. त्याखाली चिरडून ट्रकचालक जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी झालेला कंटेनरचा चालक उपचारासाठी नेतेवेळी मृत पावला.
अधिक वाचा :
- पप्पू वाडेकर खून प्रकरणी दोघे जेरबंद, पुणे पोलिसांची कारवाई
- चंद्रपूर : गॅस गळती झाल्याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
सोमवारी रात्री बाराच्या सुमारास बेळगावपासून 20 किलोमीटरवरील वंटमुरी घाटातील मुंबई इंडियन ढाब्याजवळ हा भीषण अपघात घडला.
पिठाची पोती भरलेला कंटेनर शिगावहून उत्तर प्रदेशाकडे निघाला होता. सोमवारी रात्री गाडी घाटात आल्यानंतर कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर आपली डावी बाजू सोडून दुभाजक तोडत उजव्या बाजूला घुसला.
अधिक वाचा :
- इराक : कोविड-१९ वाॅर्डला लागलेल्या आगीत ५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू
- नाना पटोले यांनी बाहेर वाच्यता करण्याची गरज नव्हती; शिवसेनेनं सुनावलं
यावेळी समोरून कांदा भरलेला ट्रक निघाला होता. पाठीमागील पूर्ण सांगाडा या ट्रकवर पडला. तर समोरील इंजिन ढाब्याजवळ थांबलेल्या टेम्पो वर जाऊन आदळले.
ज्या कांदावाहू ट्रकवर सांगाडा पडला तो ट्रक पूर्णपणे चेपला गेला. त्याखाली चिरडून चालक जागीच ठार झाला. राजेंद्र आर. डोईफोडे (वय 33 रा. घाटनांदुर, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. शिवाय कंटेनरचा चालक नीरज (वय 22) हा देखील गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
अधिक वाचा :
- महिलांच्या ड्रेसचा खिसा आणि त्यामागचं राजकारण, जाणून घ्या…
- नाना पटोले मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार
काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हल्लुर यांनी अपघातस्थळी तातडीने भेट दिली. रात्री सतत पाऊस पडत असल्याने ट्रकमध्ये अडकलेला मृतदेह काढण्यासाठी कसरत करावी लागली. रस्त्यावरच तिन्ही वाहने आडवी झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मंगळवारी पहाटे रस्ता वाहनांसाठी मोकळा करण्यात आला.
हे ही वाचा :