Aurangabad : विमानात बिघाड झाल्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द | पुढारी

Aurangabad : विमानात बिघाड झाल्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : Aurangabad : मुंबई विमानतळावर विमानात अचानक बिघाड झाल्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द झाला आहे. हा दौरा आता रविवारी (दि.8) होईल, अशी माहिती सूत्रांकडून समजत आहे.

Aurangabad : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद येथे मसिआच्या वतीने आयोजित ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोच्या उद्घाटनासाठी येणार होते. परंतु, मुंबई विमानतळावर विमानात अचानक बिघाड झाल्याने त्यांचा दौरा रद्द झाला. दुसरे विमान तयार करण्यात दोन ते तीन तास गेले असते. यामुळे विलंब टाळण्यासाठी त्यांनी औरंगाबादचा कार्यक्रम टाळला. आता आठ तारखेला समारोपाच्या सत्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Terrorist : ‘अबू उस्मान अल काश्मिरी’ दहशतवादी घोषित

Aurangabad Gram Panchayat Election : संदिपान भुमरे गटाचे दोन; राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी

Back to top button