WHO ने माहिती दिली आहे की पंजाबची QP फार्माकेम लिमिटेड कंपनी या कफ सिरपचे उत्पादन करते. कंपनीने इतर देशांमध्ये वितरणासाठी हरियाणा येथील ट्रिलियम फार्मा नावाच्या कंपनीशी करार केला आहे. या प्रकरणी या दोन्ही कंपन्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. WHO ने सर्व सदस्य देशांना हे कफ सिरप वापरू नये, असे आवाहन केले आहे. WHO म्हणते की या दोन्ही कंपन्यांनी WHO ला कफ सिरपच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुणवत्तेबाबत कोणतीही हमी दिलेली नाही.
जागतिक फार्मसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी WHO ने दोनदा अलर्ट जारी केला आहे. भारतातील विविध उत्पादकांनी तयार केलेल्या सिरपपासून गांबिया, इंडोनेशिया आणि उझबेकिस्तानमध्ये किडनी खराब झाल्याने 300 हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, भारतीय नियामक संस्थांच्या तपासणीत या औषधांच्या बॅच पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आढळून आले.
हेही वाचा