justin bieber 
Latest

justin bieber : प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरला पॅरालिसिस, व्हिडिओ केला शेअर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरच्या (justin bieber) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. त्याला रामसे हंट सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजार आहे. त्यामुळे त्याचा अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिलीय. तो आपल्या कॉन्सर्टचे कार्यक्रम रद्द करत असून काही दिवसांची सुट्टी घेत असल्याचेही सांगितले आहे, जेणेकरून तो स्वत:ला विश्रांती घेऊ शकेल. (justin bieber)

जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, त्याला हा धोकादायक आजार व्हायरसमुळे झाला आहे. हा विषाणू त्याच्या चेहऱ्याच्या मज्जातंतूंवर हल्ला करत आहे. त्यामुळे अर्धा चेहरा अर्धांगवायू झाला आहे. जस्टिनने व्हिडिओमध्ये चाहत्यांना दाखवले आहे की, त्याचा एका बाजूचा डोळा कसा ॲक्टिव्ह नाही. तो साईड स्माईलदेखील करू शकत नाही आणि त्याचे नाकदेखील हालत नाही.

जस्टिनने असेही सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे शो रद्द होत आहेत. कारण तो शो करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. हा एक अतिशय गंभीर आजार आहे. सध्या त्याला विश्रांती घ्यायची आहे, जेणेकरून तो पूर्णपणे बरा होईल. आतापर्यंत १६,७८६,१०१ लोकांनी जस्टिनचा हा व्हिडिओ पाहिला आहे आणि सेलिब्रिटींपासून ते चाहते त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

रामसे हंट सिंड्रोम म्हणजे काय?

रामसे हंट सिंड्रोम त्याच विषाणूमुळे होतो ज्यामुळे कांजण्या होतात. चिकनपॉक्स बरा होतो, पण त्याचा विषाणू शिरांमध्ये राहतो. वर्षांनंतर ते स्वतःच सक्रिय होतात. जेव्हा हे घडते तेव्हा त्याचा परिणाम चेहऱ्याच्या नसांवर होतो. जर ते गंभीर असेल तर, आपण अनेक महिन्यांनंतरही पूर्ण पुनर्प्राप्ती करू शकत नाही. रुग्ण बहिराही होऊ शकतो.

तिसऱ्यांदा जागतिक दौरा रद्द

२८ वर्षीय जस्टिनने अलीकडेच जस्टिस वर्ल्ड टूरची घोषणा केली होती. परंतु काही वेळापूर्वीच ती रद्द केली. तिसर्‍यांदा त्याचा शो पुढे ढकलण्यात आला. यापूर्वी दोनदा कोरोनामुळे पुढे ढकलावे लागले होते.

बीबर ५ वर्षांनंतर भारतात येणार होता

या दौऱ्याअंतर्गत जस्टिन बीबर पाच वर्षांनी भारतात येत होता. तो १८ ऑक्टोबरला दिल्लीत परफॉर्म करणार होता. याआधी तो २०१७ मध्ये भारतात आला होता आणि तेव्हा त्याची मैफल मुंबईत होती. मात्र, त्यांची भेट वादग्रस्त ठरली, कारण ते तीन दिवस भारतात राहणार होते, मात्र काही तास थांबल्यानंतर त्याने अचानक भारत सोडला. त्याला उष्णता सहन होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय लाईव्ह कॉन्सर्टमध्ये त्यांची गाणी लिप सिंक केल्याचाही आरोप त्यांच्यावर होता. यामुळे त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT