नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : सोशल मीडिया अॅप्स कंपन्यांसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे इथले युजर्स टिकवून ठेवण्यासाठी या कंपन्या स्वतःला सातत्याने अपडेट ठेवत असतात. पणस आता व्हाॅट्सअॅप कंपनीकडून ३० लाख भारतीयांचे व्हाॅट्सअॅप खात्यांवर बंदी घालण्यात आली. कंपनीला १६ जून ते ३१ जुलै दरम्यान ५९४ तक्रारी रिपोर्ट करण्यात आल्या. त्यामुळेच व्हाॅट्सअॅप कंपनीने ही कारवाई केलेली आहे.
मंगळवारी व्हाॅट्सअॅपकडून (Whatsapp) ताज्या रिपोर्टनुसार सांगण्यात आलं आहे की, २६ जून ते ३१ जुलै दरम्यान ३ लाख २७ लाख भारतीय खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
व्हाॅट्सअॅपने यापूर्वीही ज्या भारतीयांच्या खात्यांवर बंदी घालण्यात आल्या होत्या. त्यातील ९५ टक्केहून जास्त युजर्सवर बेकायदेशीररित्या व्हाॅट्सअॅप वापरल्याचा आरोप होता.
जागतिक पातळीवर व्हाॅट्सअॅपने प्रत्येक महिन्यामध्ये सुमारे ८० लाख व्हाॅट्सअॅप युजर्सवर बंदी घालते. त्यातून बेकायदेशीर व्हाॅट्सअॅप वापरल्याचे कारण दाखून युजर्सची खाती बंद करण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅप युजर्स मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं महत्वाचं खूप वाढलेलं आहे. चॅटिंग, फोटो, व्हिडीओ काॅल, व्हाईस काॅल, अशा अनेक सुविधा आपल्याला व्हॉट्सअॅपकडून मिळतात.
पहा व्हिडीओ : ओंकारेश्वर : एक अद्भुत ज्योतिर्लिंग
हे वाचलंत का?