नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अगदी दुचाकीपासून ते बसपर्यंत धावत्या वाहनांमध्ये आग लागत आहे. अशीच एक घटना शनिवारी सकाळी नागपूर शहरातील तुकडोजी महाराज चौकात घडली. काही कळण्यापूर्वी आगीने संपूर्ण गाडीला विळखा घातला. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. (Nagpur)
अग्नीशमन दलाच्या जवानांनी चारही बाजुने पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. सकाळी वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक बराचकाळ खोळंबली होती. धावत्या वाहनांना लागलेल्या आगीमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन थांबविले. दरम्यान वाहन थांबवून तो बाहेर आल्याने या अपघातात तो बचावला. अनेकांनी आपल्या डोळ्यांनी या ' द बर्निंग कार' चा थरार अनुभवला. बरेचदा वाहन दुरुस्ती करणारे तात्पूरती व्यवस्था म्हणून वायर जोडतात. पण, आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. (Nagpur)
हेही वाचा