गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : "केवळ बिद्री साखर कारखान्याची सत्ता मिळविण्यासाठी ऊस नसणाऱ्यांना बोगस सभासद करणारे चेअरमन के. पी. पाटील यांना 'बोगस चेअरमन' म्हणून किताब दिला जाईल," अशी जहरी टीका आमदार प्रकाश आबीटकर यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी.पाटील यांच्यावर केली. गारगोटी येथील इंजुबाई सभागृहात आयोजित केलेल्या सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बी. एस. देसाई अध्यक्षानी होते. जेष्ठ नेते मारूतीराव जाधव, के. जी. नांदेकर प्रमुख उपस्थितीत होते.
संबंधित बातम्या :
यावेळी आमदार आबीटकर म्हणाले की, प्रशासकांना जमते तुम्हाला का जमत नाही? टेस्टला ऑडिटला तुम्ही का घाबरता? नफ्या इतकाच तोटा? या प्रश्नांची उत्तर न देता केवळ माझ्या द्वेशासाठी आरोप केले जात आहेत. खंडीत बिलाचा हिशोब नाही, इंदापूर येथील मालोजी रोडलाईन्सला ऊस तोडणी वाहतुकीसाठी दिलेले कोट्यवधी रुपये, तोडणी वाहतूक खर्च या सर्वातून सभासदांची लुट करणाऱ्यांचा हिशोब चुकता केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा आ. आबीटकर यांनी दिला.
मारूतीराव जाधव यांनी कर्जफेड झाली असताना देखील ९.८१ कोटीचा ढपला पाडल्याची टीका करत के. पीं. पाटील यांच्या कारभाराचा पाढा वाचला. दत्तात्रय उगले म्हणाले, बिद्री कारखाना सभासदांच्या मालकीचा असून कोणाच्या बापजादाची प्रॉपर्टी नाही. बाबा नांदेकर यांनी करोडो रूपयांचे घोटाळे करणा-यांना हद्दपार करा असे आवाहन केले. यावेळी सुर्याजी देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक सर्जेराव मोरे यांनी केले. याप्रसंगी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, कल्याणराव निकम, आर. जी. पाटील, अरूण जाधव, अशोकराव फराकटे, विजय बलुगडे, अरुण जाधव, अशोकराव भांदीगरे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन नंदकुमार निर्मळे यांनी केले.
हेही वाचा :