

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत लोकल प्रवास १५ ऑगस्टपासून सुरू मात्र, तो करताना ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि १४ दिवस झाले आहेत. त्यांना मुभा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आठ वाजता सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला यावेळी केली. पण यावेळी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह करताना त्यांच्या मागे ठेवलेल्या झेंड्यांवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.
पुण्यामधील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील एक पोस्ट केली शेअर केली आहे. ती सध्या चर्चेत आहे. असिम सरोदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कालच्या लाइव्ह भाषणामधील स्क्रीनशॉर्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आणून दिलं आहे.
भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये हा साधा नियम पाळावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती.
खरे तर मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये. दुर्दैव आहे भारतीय लोकशाहीचे की आज आपल्या देशात राष्ट्रध्वज केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला उत्सवी स्वरूपात मिरविण्याच्या कामाचे राहिले आहेत की काय असा प्रश्न पडतो.
अनेकांसाठी त्यांचे राजकीय पक्षांचे ध्वज व धर्मध्वजच महत्वाचे आहेत.
इतर कोणातच ध्वज महत्वाचा नसलेले भारतीय नागरिकच या देशाला अखंड ठेवतील. लोकशाही अशाच नागरिकांच्या व नेत्यांच्या शोधात आहे.
भारतीय ध्वज संहिता indian flag code सगळ्यांनी वाचवा तसेच याबाबतच्या नियमांची माहिती घ्यावी. अस वकील असिम सरोदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
वकील असिम सरोदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या या फेसबुक पोस्ट वर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.