मुन्नवर राणा यांना एन्काऊंटरमध्ये मारले पाहिजे: यूपीच्या मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

फाईल फोटो
फाईल फोटो
Published on
Updated on

लखनऊ, पुढारी ऑनलाईन: मुन्नवर राणा यांच्यासारखे लोक उत्तरप्रदेशमध्ये राहण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांना देश सोडून जावा लागेल.

मुन्नवर राणा यांना एन्काऊंटरमध्ये मारले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेश सरकारमधील राज्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी केले.

अधिक वाचा: 

योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर उत्तरप्रदेशात राहणार नाही. त्याऐवजी कोलकात्यात नवे घर शोधेन असे वक्तव्य मुन्नवर राणा यांनी केले होते. यावर शुक्ला यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

प्रियांका गांधी यांच्या उत्तरप्रदेश दौऱ्याबाबतही त्यांनी वादग्रस्त टिपण्णी केली असून, त्या राजकीय पर्यटनासाठी उत्तरपदेशात येतात. लोक त्यांना पाहण्यासाठी येतात, असे ते म्हणाले.

अधिक वाचा:

राज्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांना बलिया येथे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मुन्नवर राणा त्या लोकांमधील आहेत ते १९४७ ला फाळणीवेळी भारतात थांबले होते. हे लोक देशांतर्गत सुरक्षा धोक्यात आणून षड्यंत्र रचत आहेत.'

गेल्या काही दिवसांपासून राणा यांनी योगी सरकारविरोधात वक्तव्ये केली होती. योगी आदित्यनाथ पुन्हा सत्तेत आले तर उत्तरप्रदेश सोडून दुसऱ्या राज्यात जावे लागेल. खरं तर आता उत्तरप्रदेश मुसलमानांना राहण्यास लायक नाही.

अधिक वाचा:

यावर शुक्ला यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांनी उत्तरप्रदेशचा दौरा केला होता. त्याबाबतही शुक्ला यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, 'त्यांचा तीन दिवसीय दौरा म्हणजे राजकीय पर्यटन आहे. दीड वर्षांत उत्तर प्रदेशातील वातावरण आणि पाऊस पहायला त्या आल्या होत्या. लोक त्यांना पाहण्यासाठी येतात.'

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ: रेड डॉट मोहीम आहे तरी काय?

https://youtu.be/guGqYNgn5jU

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news