बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वार्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण व कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी गेले दोन दिवस पाऊस विजांच्या कडकडाटासह पडत आहे. काही ठिकाणी विजेपासुन नुकसानही झाले आहे. हे नुकसान होऊ नये म्हणुन काय काळजी घ्यावी हे आम्ही जाणून घेऊया…