Rishabh Pant Record : ऋषभ पंत बनणार भारताचा नवा कसोटी ‘सिक्सर किंग’! फक्त 4 षटकारांची गरज

ऋषभ पंतला मँचेस्टर कसोटीत ऐतिहासिक कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे.
Rishabh Pant
ऋषभ पंत. File Photo
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा आणखी एका ऐतिहासिक मैलाचा दगड गाठण्याच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीत मैदानात उतरताच पंतला भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज होण्याची नामी संधी आहे. सध्या पंतच्या नावावर 46 कसोटी सामन्यांतील 81 डावांत 88 षटकारांची नोंद आहे. या यादीत तो भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्माच्या बरोबरीने आहे. हिटमॅनने देखील कसोटीत 88 षटकार खेचले आहेत.

Rishabh Pant
England Team Fined : इंग्लंडच्या लॉर्ड्स कसोटी विजयाला गालबोट! ICCकडून WTC गुणांना कात्री, एक चूक पडली महागात

रोहितच्या बरोबरीनंतर पंतचे पुढील लक्ष्य भारताचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आहे. सेहवागच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 91 षटकार आहेत. म्हणजेच, जर पंत मँचेस्टर कसोटीत किमान 4 षटकार मारण्यात यशस्वी झाला तर तो सेहवागला मागे टाकून भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल.

Rishabh Pant
ICC Test Rankings : ‘कसोटी’च्या सिंहासनावर पुन्हा रूटचा राज्याभिषेक! जैस्वाल-गिल-पंत यांची धक्कादायक घसरण

लहान कारकिर्दीत मोठी कामगिरी

विशेष म्हणजे, पंतने ही कामगिरी अवघ्या 46 कसोटी सामन्यांमध्येच साध्य केली आहे, तर रोहित आणि सेहवाग यांनी हे आकडे बरेच अधिक सामने खेळून गाठले होते. जर पंतने हा विक्रम आपल्या नावावर केला, तर तो असा कीर्तिमान प्रस्थापित करेल, जो येत्या अनेक वर्षांमध्ये इतर फलंदाजांना मोडणे सोपे नसेल. कसोटी क्रिकेटमध्ये इतक्या कमी सामन्यांमध्ये षटकारांचा हा टप्पा गाठणे ही मोठी उपलब्धी आहे.

Rishabh Pant
IND vs ENG Manchester Test : मँचेस्टर कसोटीसाठी संघ जाहीर! दोघांना डच्चू, 8 वर्षांनंतर फिरकीपटूचे कमबॅक

कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज

  • वीरेंद्र सेहवाग : 91 (104 कसोटी)

  • ऋषभ पंत : 88 (46 कसोटी)

  • रोहित शर्मा : 88 (67 कसोटी)

  • महेंद्रसिंग धोनी : 78 (90 कसोटी)

  • रवींद्र जडेजा : 74 (83 कसोटी)

Rishabh Pant
Team India villain Lord’s Test : टीम इंडियाच्या ‘लॉर्ड्स’ पराभवाचे 3 ‘खलनायक’! याच त्रिकुटाने केला भारताचा घात

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात अपयश

ऋषभ पंत याची आक्रमक शैली आणि दडपणाखाली खेळण्याची क्षमता यामुळे तो इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ठरतो. विशेषतः परदेशी मैदानांवर त्याने आपल्या फलंदाजीने अनेकदा भारताला संकटातून बाहेर काढले आहे. तथापि, लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 74 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीने विशेष काही करता आले नाही. परिणामी, धावांचा डोंगर उभारण्याची सर्व जबाबदारी रवींद्र जडेजावर पडली आणि त्याला दुसऱ्या टोकाकडील कोणत्याही फलंदाजाचा साथ मिळाला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news