IND vs ENG Test : भारतीय फलंदाजांची दुर्मिळ कामगिरी; जाणून घ्या पाचव्या कसोटीत काय घडलं? | पुढारी

IND vs ENG Test : भारतीय फलंदाजांची दुर्मिळ कामगिरी; जाणून घ्या पाचव्या कसोटीत काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने मजबूत पकड पकडली आहे. सामन्याच्या सुरूवातीला नाणेफेक जिंकून इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. परतु, इंग्लंडची फलंदाजी भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात सापडली आणि इंग्लंडचा डाव 218 धावांवर गुंडाळला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी एक दुर्मिळ कामगिरी केली आहे. जाणून घेवूयात त्याबद्दल… (IND vs ENG Test)

कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 218 धावांपर्यत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय आघाडीचे फलंदाज रोहित आणि शुभमन यांनी केलेली शतकी खेळी तर यशस्वी, सर्फराज आणि देवदत्त यांनी केलेली अर्धशतकी खेळीमुळे त्यांनी दुर्मिळ कामगिरी केली. ज्यामध्ये संघातील टॉप ऑर्डरमधील पाच खेळांडूनी दोन शतकी आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. या खेळीच्या जोरावर भारताने सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. यामध्ये रोहितने 103 तर शुभमनने 110 धावांची खेळी केली. यांच्यासह यशस्वी (57), सर्फराज (56) आणि देवदत्त (65) यांनी अर्धशतकी खेळी केली. (IND vs ENG Test)

सामन्यात आत्तापर्यंत काय घडलं…

टी- ब्रेकपर्यंत भारत 3 बाद 376

दुसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारताने पहिल्या डावात तीन विकेट गमावून मोबदल्यात 376 धावा केल्या .  देवदत्त पडिक्कल आणि सर्फराज खान यांनी  चौथ्या विकेटसाठी  97 धावांची भागीदारी केली.   सर्फराजने कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले . त्याचबरोबर पडिक्कलने कसोटीतील पदार्पणाच्या डावात आतापर्यंत चांगली फलंदाजी केली.इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. आज भारताला दोन धक्के बसले. रोहित शर्मा 103 धावा करून बाद झाला तर शुभमन गिल 110 धावा करून बाद झाला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली. (IND vs ENG Test)

लंचपर्यंत भारत 1 बाद 264

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारताने एका विकेट गमावून 264 धावा केल्या.  रोहित शर्मा   आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. भारताला एकमेव झटका गुरुवारी यशस्वीच्या रूपाने बसला. तो 57 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

आजच्या पहिल्या सत्रातील 30 ओव्हरच्या खेळात भारताने एकही विकेट न गमावता 4.30 च्या रन रेटने 129 धावा केल्या. यावेळी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12वे शतक तर शुभमन गिलने चौथे शतक झळकावले. या मालिकेतील रोहितचे हे दुसरे शतक ठरले. याआधी राजकोट येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 131 धावा केल्या होत्या. तर शुभमनचे या मालिकेतील पहिले शतक आहे. शुभमनने चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.

रोहित-शुभमन यांचे धमाकेदार शतक

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील 12वे शतक झळकावले आहे. याच्या पुढच्याच बॉलवर शुभमन गिलनेही आपले शतक झळकावले. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक आहे. त्याच्या शतकाच्या वेळी त्याचे वडीलांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केले. रोहितने 154 बॉलमध्ये तर शुभमनने 136 बॉलमध्ये शतक झळकावले. (IND vs ENG Test)

या मालिकेत शुभमनचे तीन वेळा शतक हुकले. मात्र, आज त्याने आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर या मालिकेत रोहितने आणखी एक शतक झळकावले आहे. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 131 धावा केल्या होत्या. भारताने एका विकेटवर 262 धावा केल्या आहेत. सध्या शुभमन 100 धावा करून क्रीजवर आहे आणि रोहित 101 धावा केल्यानंतर. दोघांमध्ये 158 धावांची भागीदारी झाली आहे.

इंग्लंडची फलंदाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी फोडली. त्याने डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेटने आपल्या खेळीत 27 धावा केल्या. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोप 11 धावा करू शकला. (IND vs ENG 5th Test)

पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी 25.3 षटके टाकली. यामध्ये इंग्लंडने 2 विकेट गमावून 100 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 29.3 षटकात 6 गडी गमावून 94 धावा केल्या. एके काळी इंग्लंडची धावसंख्या ३८व्या षटकात दोन गडी बाद १३७ धावा अशी होती. क्रॉलीची विकेट पडल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. 137 धावांवर दोन बाद अशी धावसंख्या असलेला संघ 58 व्या षटकात 218 धावांवर गारद झाला.

क्रॉलीने 108 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 79 धावा केल्या. जो रूट 26 धावा करून बाद झाला, तर 100वी कसोटी खेळणारा जॉनी बेअरस्टो 29 धावा करून बाद झाला. कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही. इंग्लंडची धावसंख्या 175 धावांवर असताना संघाने बेअरस्टो, रूट आणि स्टोक्सच्या विकेट्स गमावल्या. अश्विनने डावाच्या 50 व्या षटकात हार्टली (6) आणि वूड (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर अँडरसनला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा डाव 218 धावांवर आटोपला. बशीर 11 धावा करून नाबाद राहिला. गोलंदाजीमध्ये भारताकडून कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी सामन्यात चार विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व 10 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या.

हेही वाचा :

Back to top button