अंकिता कोंवर म्हणते ‘मेडल जिंकलं तर भारतीय, अन्यथा चिंकी-चायनीज-नेपाळी-कोरोना'
पुढारी ऑनलाईन डेस्क : टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू ४९ वजनी गटात रौप्य पदक विजेती ठरली. यानंतर तिच्यावर भारतातून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. तिने २१ वर्षानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. तिच्या यशाची चर्चा सगळीकडे सुरु झाली. अनेकांनी तिच कौतुक केल आहे. पण अभिनेता मिलिंद सोमण यांची पत्नी अंकिता कोंवर यांनी वेगळ्या विषयावर आवाज उठवला आहे.
- हार्दिक पांड्या कडून पदार्पण करणाऱ्या चमिका करुणारत्नेला मिळाले खास गिफ्ट
- पाॅर्नोग्राफी आणि इरोटीका यामध्ये फरक काय?
“तुम्ही जर ईशान्य भारतातले असाल आणि जर तुम्ही भारतासाठी पदक जिंकलं तरच तुम्ही भारतीय म्हणून ओळखले जाऊ शकता. नाही तर आपण सगळे ‘चिंकी’, ‘चीनी’, ‘नेपाळी’ किंवा मग ‘करोनाचा कोणता तरी नवीन प्रकार’ म्हणून ओळखले जातो. भारत फक्त जातिवादच नाही तर वर्णभेदानेही ग्रासलेला आहे, अस अंकिता कोंवर यांनी इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटल आहे.
- Tokyo Olympics: मनू भाकर – सौरभ चौधरी जोडूकडून निराशा
- कृणाल पांड्या कोरोनाग्रस्त; संपूर्ण संघ क्वारंटाईन
अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
अंकिताने या पोस्टमध्ये ईशान्येतील लोकांशी भेदभाव करणाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला आहे. अंकिताच्या या पोस्टला अनेकांनी सपोर्ट केला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे.
अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. ‘हे खूपच दुखदायक आणि निराशाजनक आहे. एवढी सांस्कृतिक विविधता असुनही आपल्यात मानवतेची कमी आहे’ अशी प्रतिक्रिया एका वापरकर्त्याने दिली आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने ‘तुम्ही लिहिलेल बरोबर आहे, हे सगळ बदललं पाहीजे’. अस लिहिल आहे.
View this post on Instagram
रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानू साठी डॉमिनोज पिझाची खास ऑफर
टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू ४९ वजनी गटात रौप्य पदक विजेती ठरली. यानंतर तिच्यावर भारतातून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. तिने २१ वर्षानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून दिले.
पदक जिंकल्यानंतर तिने एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिला पिझा खाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर डॉमिनोज पिझा या प्रसिद्ध पिझा फ्रेंचायजीने मीराबाई चानू साठी एक खास घोषणा केली.
हे ही वाचलत का :
- karnataka CM: येडियुराप्पांच्या राजीनाम्यामुळे लिंगायत मते फुटतील?
- अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या कवितेची चर्चा; बेरंग, बेचव आयुष्याला कलाटणी
- काँग्रेस पक्षामुळेच संसदेचे कामकाज ठप्प : पंतप्रधान नरेंद्र माेदी