BB-१५ : अभिजीत बिचुकले-रश्मी देसाई ‘तिकीट-टू-फिनाले’च्या शर्यतीतून बाद

अभिजीत बिचकुले आणि रश्मी देसाई  ‘तिकीट-टू-फिनाले’च्या शर्यतीतून बाद
अभिजीत बिचकुले आणि रश्मी देसाई ‘तिकीट-टू-फिनाले’च्या शर्यतीतून बाद

पुढारी ऑनलाईन

'बिग बॉस-१५ 'ची अंतिम फिनाले जवळ आलं आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी स्पर्धकांनी ट्रॉफी जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक स्पर्धक एकमेकांना टक्कर देताहेत. पण, हा शो जितका जवळ येतोय. तितके स्पर्धकांच्या नात्यात अंतर वाढतय. करण कुंद्रा, तेजस्वी आणि उमरच्या नात्यात दुरावाही निर्माण झाला आहे. आता अभिजीत बिचुकले-रश्मी देसाई 'तिकीट-टू-फिनाले'च्या शर्यतीतून बाद झाले आहेत.

अभिजीत बिचकुले- रश्मी देसाई तिकीट-टू-फिनालेतून बाहेर

तिकीट-टू-फिनाले टास्कमधून वगळू इच्छितात असे बिग बॉसने कुटुंबातील सदस्यांना एका सदस्याचे नाव देण्यास सांगितले होते. त्य़ाचे नाव कुटुंबातील सदस्यांनाही नामांकित केले जाईल. मात्र, कुटुंबातील अनेक सदस्यांनी rashmi आणि abhijit ची नावे घेतली. दोघांना ५-५ मते मिळाली. त्यामुळे बिग बॉसने दोघांनाही तिकीट-टू-फिनाले टास्कमधून वगळले.

तिकीट-टू-फिनाले टास्कमध्ये तेजस्वीने रश्मीचे नाव घेतले. तर करण कुंद्राने अभिजीत बिचुकलेचे नाव घेतले. करणने टास्कमध्ये रश्मीचे नाव घ्यावे आणि तिला बाहेर करावे, अशी तेजस्वीची इच्छा होती. पण करणने करणने रश्मीचे नाव घेण्यास नकार दिला. त्यावर तेजस्वी करणवर रागावली होती.

तेजस्वी प्रकाश तिचा मित्र निशांत भट्टसोबत करण कुंद्राविषयी बोलताना दिसली होती. तेजस्वीने निशांतला सांगितले की, करणला सगळ्यांना खुश ठेवायचे आहे. ज्यांना तो आवडत नाही. करणने या सर्वांना देखील मित्र बनवले आहे. पण, घरातील हे वास्तव चित्र आहे की, करणशी कोणी गैरवर्तन केले तर तेजस्वी प्रकाश त्याच्याशी बोलत नाही.

राखी सावंत ही करण कुंद्रासोबत तेजस्वीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना दिसली. राखीने करणला सांगितले की, जर मला मार्चमध्ये लग्न करायचे असेल, तर मार्चमध्येच त्याने तेजस्वीशी लग्न करावे. तेजस्वीला बाहेर जाऊन सोडून देऊ नकोस, असेही राखी करणला म्हणाली. राखीच्या बोलण्यावर करण म्हणतो की, तो बाहेर जाऊन तेजस्वीसोबतचे नाते आणखी घट्ट करेल.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news