मन झालं बाजींद : गुलीचं कारस्थान; कृष्णा-राया वाचणार का?
पुढारी ऑनलाईन
प्रेक्षकांची आवडती मालिका मन झालं बाजींद या मालिकेचा महाएपिसोड पाहायला मिळाला. ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा-राया ही जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे. मात्र, मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळला. गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं ठरलं. कृष्णा-राया यांच्या फोटोला हार पाहून तर हेच स्पष्ट होतंय.
इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये राया आणि कृष्णाच्या फोटोला फुलांचा हार दिसत आहे. हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, गुरुजींनी सांगितलेलं भाकीत अखेर खरं ठरलं.
zeemarathiofficial’s आणि manzalabajind_official ने इन्स्टाग्रामवर गुलीचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात ती रडताना दाखवलीय. नंतर ती हसताना दाखवलीय. त्यामुळे या व्हिडिओला कमेंट्स येत आहेत. दोघे गुलीच्या षडयंत्रला बळी पडणार का? या दोघांच्या विरोधात गुलीचं षड्यंत्र यशस्वी ठरेल का? या गोष्टीची वाट प्रेक्षकांना पाहावी लागणार आहे.
परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा Raya असं त्याचं कौतुक केलं जातं.तर krushna मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढली आहे. सी. ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन यांनी मुख्य भूमिका साकारलीय. मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केले आहे. तर वाघोबा प्रॉडक्शनची निर्मिती आहे.
हेही वाचलं का?
- कर्नाटक प्रवेशासाठी आता दोन डोससोबत आरटीपीसीआर आवश्यक
- म्युच्युअल फंडाची डिजिटल झेप…
- आंतरजाल बनले मायाजाल
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram