पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील आगामी मालिका 'दिल दिया गल्लां' च्या कलाकारांना अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये वाहेगुरूजींचा आशीर्वाद घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आणि त्यांनी या संधीचा लाभ घेतला.
छोट्या पडद्यावर लवकरच सुरू होणारी नवीन मालिका 'दिल दिया गल्लां' ही स्थलांतराबाबतची कथा आहे. जी भावनिक असण्यासोबत सकारात्मक व आशेच्या दृष्टिकोनातून दाखवण्यात येणार आहे. या मालिकेतील अभिनेता पंकज बेरी, जसजीत बब्बर, संदीप बसवाना, रवी गोसैन, कावेरी प्रियम व हेमा सूद यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतला.
ही मालिका कुटुंबातील तीन पिढ्यांमधील नात्यांत गुंतलेली आहे. ही संघर्षाची कथा असून ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये शारीरिक व भावनिक तफावत पाहायला मिळतात. पहिल्या दोन पिढ्या त्यांच्या गतकाळाला विसरून क्षमा करण्यास नकार देतात, पण तिसऱ्या' पिढीने त्यांच्यामधील तफावत दूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनंतर ते आपापसातील नाते सुधारण्याचा प्रयत्न करतात.
कुटुंब एकमेकांमधील अंतरामुळे विभागले असले तरी त्यासाठी गैरसमज निर्माण करणारी स्थिती, मन दुखावणाऱ्या भावना आणि रूढीबद्ध विश्वास कारणीभूत असतात. ही बहुप्रतिक्षित मालिका लवकरच प्रसारित होणार आहे. या हिंदी-भाषिक मालिकेची निर्मिती रश्मी शर्मा यांनी केली आहे.
हेही वाचलंत का?