Raj Thackeray: …हा तर ‘स्वभाव’ आणि ‘वागणुकी’चा पराभव – राज ठाकरे

राज ठाकरे
राज ठाकरे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक निवडणुकीतील पराभव म्हणजे स्वभाव आणि वागणुकीचा हा परिणाम आहे. आपलं कोणीच वाकडं करू शकत नाही, अशा विचारांचा हा पराभव आहे; असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे. अंबरनाथ येथून राज ठाकरे हे माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, जनतेला आणि लोकांना कधीही कोणत्याही पक्षाने गृहित धरू नये. कर्नाटक निकालावरून सर्वच पक्षांनी बोध घ्यावा; असा सल्ला देखील कर्नाटक निवडणुकीवर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी दिला. माध्यमांनी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे' ला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला असला तरी, याचा चांगलाच परिणाम झाल्याचे कर्नाटक निवडणुकीतून दिसून आले आहे, असेही त्यांनी (Raj Thackeray)  म्हटले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news