INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीच्‍या बैठकीत २३ पक्षांचा सहभाग, पाच मुद्द्यांवर सहमती

एसआयआरसंबंधी सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
INDIA Alliance Meeting
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत २३ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.Pudhari
Published on
Updated on

INDIA alliance meeting Delhi

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत २३ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. बैठकीत देशातील आर्थिक परिस्थिती, नीट पेपरफुटी, सीबीएसई गोंधळ प्रकरण, मतदार याद्यांचे एसआयआर यांसह विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली.

इंडिया आघाडीची बैठकीत २३ पक्षांचा सहभाग

इंडिया आघाडीच्या बैठकीला काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि जयराम रमेश; तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी आणि डेरेक ओ'ब्रायन; राजदचे तेजस्वी यादव आणि संजय यादव; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे; समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव; माकपचे जॉन ब्रिटास, ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, कपिल सिब्बल यांनी उपस्थिती लावली होती. तर शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन ऑनलाइन उपस्थित होते.

INDIA Alliance Meeting
INDIA alliance challenges | ‘इंडिया’ आघाडीसमोर आव्हान

पाच प्रमुख मुद्द्यांवर एकमताने निर्णय : मल्लिकार्जुन खर्गे

बैठकीनंतर आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, बैठकीत पाच प्रमुख मुद्द्यांवर एकमताने निर्णय घेण्यात आले असून, त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल. खर्गे म्हणाले की, मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरावृत्ती (एसआयआर) आणि मतचोरी यांसारख्या मुद्द्यांवर भारताच्या सरन्यायाधीशांना संयुक्तपणे पत्र लिहिण्याचा निर्णय ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत पक्षांनी उपस्थित केलेल्या चिंतांवर सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे हे पत्र लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यावर नेत्यांचे एकमत झाले.

INDIA Alliance Meeting
DMK skips INDIA alliance meeting | द्रमुकचा 'INDIA' आघाडीला मोठा झटका, दिल्लीतील बैठकीकडे फिरवली पाठ

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

नीट आणि सीबीएसई परीक्षांना बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात केल्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना जबाबदार धरून त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्याचा निर्णयही आघाडीने एकमताने घेतला आहे. परीक्षांशी संबंधित मुद्द्यांच्या चुकीच्या हाताळणीचा विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हितावर विपरीत परिणाम झाला असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नमूद केले.

INDIA Alliance Meeting
Mallikarjun Kharge | "प्रेम आमच्यावर अन् लग्न मोदींशी!" खर्गेंच्या देवेगौडांवरील विधानाने पंतप्रधानही खळखळून हसले

केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी

देशाची सध्याची चिंताजनक आर्थिक स्थिती, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उपेक्षित घटकांवरील अत्याचार यांसारख्या लोकहिताच्या मुद्द्यांवर तातडीने धोरणात्मक हस्तक्षेपाची गरज आहे. यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असे आवाहनही ‘इंडिया’ आघाडीने केले.

INDIA Alliance Meeting
Maharashtra politics : मुंबईत भाजपाला, ठाण्यात शिंदेंना झुकते माप

आघाडींतर्गत नियमित चर्चा करण्याचा निर्णय

काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले की, आघाडींतर्गत नियमित चर्चा करण्याचा निर्णयही विरोधी पक्षांनी एकमताने घेतला आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठका दर दोन महिन्यांनी एकदा घेतल्या जातील आणि पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबाद येथे होईल, असेही नेत्यांनी मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.संसदेच्या कामकाजादरम्यान समन्वय अधिक दृढ करण्यासाठी, आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदीय रणनीतीविषयक बैठका सुरू ठेवण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. महत्त्वाच्या कायदेविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर एकसमान भूमिका सुनिश्चित करण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात दररोज सकाळी समन्वय बैठका घेतल्या जातील.

INDIA Alliance Meeting
Rahul Gandhi - Uddhav Thackeray |राहूल गांधी यांच्या बंगल्‍यावर उद्धव ठाकरेंचे स्‍नेहभोजन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा

केंद्राच्‍या विविध धोरणांविरोधात विरोधी पक्षांनी एकत्रित प्रयत्न करावेत

बैठकीच्या सुरुवातीच्या भाषणात खर्गे यांनी 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांमध्ये अधिक एकता राखण्याचे आवाहन केले. तसेच, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर देशाला भेडसावणाऱ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रित प्रयत्न अधिक तीव्र करावेत, असे त्यांनी सांगितले. १७ एप्रिल २०२६ रोजी लोकसभेत केंद्र सरकारच्या प्रस्तावित 'मतदारसंघ पुनर्रचना' विधेयकाला विरोध करून ते फेटाळून लावताना विरोधी पक्षांनी आपली ताकद आणि एकजूट दाखवून दिली होती, याची त्यांनी आठवण करून दिली. या यशाचा आधार घेऊन आघाडीने आगामी काळातही परस्पर समन्वयाने काम करत राहावे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news