

उत्तरप्रदेशच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, युपीची सत्ता काबीज केल्यानंतर लखनौ ते आझमगढ मार्गे गाझीपूर असा सहा पदरी "पुर्वांचल एक्स्प्रेस वे"च्या (Purvanchal Expressway) निर्मीतीचे काम सुरू केले होते. 341 किलोमीटरचा असणारा हा एक्सप्रेस वे अवघ्या 36 महिन्यांत तयार करण्यात आला असून, त्यासाठी 22 हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
या मार्गामुळे देशातील एकूण द्रुतगती मार्गामध्ये उत्तर प्रदेशचा वाटा आता 18 टक्क्यांवरून थेट 28 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
या द्रुतगती मार्गाच्या निर्मितीमुळे युपीच्या पूर्वेकडील शहरे राज्याच्या राजधानीबरोबरच देशाच्या राजधानीशी इतर द्रुतगती मार्गाद्वारे जोडली जाणार आहेत.
त्यामुळे पूर्वांचलमधील शहरांमधून वाहतुकीची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. हा एक्स्प्रेस वे सध्याच्या आग्रा ते लखनऊ एक्सप्रेसवे आणि यमुना एक्सप्रेसवे बरोबरही जोडला जाणार आहे.
पुर्वांचल एक्स्प्रेस वेचे महत्व
हे ही वाचा :