

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर तिसऱ्या दिवशीही तणाव पाहायला मिळाला. हुगळी परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. भागात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. पोलिस विविध भागात छापे टाकत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. लोकांना शांततेचे आवाहन केले जात आहे. (West Bengal Violence)
हेही वाचा