सायंकाळपर्यंत फोन येईल! येडियुरप्पांनी पद सोडण्याचे दिले स्पष्ट संकेत

सायंकाळपर्यंत फोन येईल! येडियुरप्पांनी पद सोडण्याचे दिले स्पष्ट संकेत
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्रिपदाबाबतचा हायकमांड निर्णय घेणार आहेत, त्यांचा आदेश सायंकाळपर्यंत मला प्राप्त होणार आहे, त्याच्या सूचनांच्या प्रतीक्षेत मी आहे, अशी माहिती मुख्यमंत्रीबी. एस. येडियुराप्पा यांनी दिली. बी. एस. येडियुराप्पा आज संकेश्वर येथे पत्रकारांशी बोलत होते.

संकेश्वर येथे पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर त्यांची पत्रकारांनी भेट घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती आदी उपस्थित होते.

येडियुराप्पा म्हणाले की, मुख्यमंत्रीपदावर चर्चा सुरू असली तरी याचा अंतिम निर्णय हायकमांड घेणार आहेत. ते सायंकाळी आपला निर्णय कळवणार आहेत.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बेळगाव जिल्ह्यात पूर आला आहे. पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पूर ओसरेल असे वाटते.

आज सायंकाळी आपण अधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधीशी चर्चा करणार आहे. त्यानंतर भरपाईचा निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा यांनी रविवारी दुपारी बारा वाजता यमगर्णी येथील वेदगंगा नदी पात्राची पाहणी केली.

पुणे बंगळूर महामार्गावरून पाणी वाहत असल्याने गेल्या तीन दिवसापासून महामार्ग बंद आहे. याची माहिती घेऊन शेती पिकाची नुकसानीची पाहणी केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पूरग्रस्त भागातील आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.

गोविंद कार्जोळ, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी, मंत्री आर अशोक, विधान परिषदेतील पक्षप्रतोद महांतेश कवटगीमठ, उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी कोडनी या गावी जाऊन पुराची पाहणी केली.

हे ही पाहा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news