लाठीचार्जचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील : अनिल देशमुख | पुढारी

लाठीचार्जचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील : अनिल देशमुख

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : “जालनामध्ये अमानुष पध्दतीने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला त्याचा निषेध करतो. आतापर्यंत मराठा मोर्चे शांततेच्या मार्गाने झाले. हाही शांततेत मोर्चा होता. मात्र, पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्जचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील,” असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (दि.२) माध्यमांशी बोलताना केला आहे.

यावेळी देशमुख म्हणाले की, राज्य सरकारने मराठा समाजाच्या किती मागण्या पूर्ण केल्या? हे पुढं आलं पाहिजे. गृहमंत्री यांनीच लाठीचार्जचा आदेश दिला असेल. दीड वर्षात सरकारने मराठा समाजासाठी काहीही केले नाही. मराठा समाजाची किती आश्वासन पूर्ण केली, ते सरकारने सांगावे. मुळात हे संपूर्ण प्रकरण पोलिसांना शांततेत हाताळता आले असते, तरीही लाठीचार्ज करण्याची आवश्यकता का पडली? गृहमंत्र्यांनी यांची जबाबदारी घ्यावी, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button