Dy CM Devendra Fadnavis: 'मविआ' सरकारने विदर्भाला न्याय दिला नाही- फडणवीसांची ठाकरेंवर टीका
पुढारी ऑनलाईन: शिवसेनेने २०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे राज्यात नाकर्ते सरकार आले होते. या काळात मविआ सरकारने विदर्भाला काहीच दिले नाही. ठाकरे सरकारने विदर्भाला न्याय दिला नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वाशिमच्या रिसोडमध्ये आोयजित भाजपच्या सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात मविआचे नाकर्ते सरकार आले होते. पण आज शिंदेच्या रूपाने खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. आमच्या सरकारने हजारो कोटी रूपयांची मदत शेतकऱ्यांनीा दिली. आज १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होतेय.
देशातील सरकारने गेल्या ९ वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला आहे. मोदींच्या अनेक योजनांमुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात परिवर्तन दिसून आले आहे. देशात मोठ्या प्रमाणात परिवर्तन पाहायला मिळाले आहे. राज्यात देखील बावनकुळे यांच्या २४ तास कार्यरतपणामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विस्तार होत असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.
LIVE | भारतीय जनता पार्टी संकल्प सभा | वाशिम@BJP4Maharashtra @cbawankule#bjp4maharashtra #bjp #Washim https://t.co/IF3te9qHVY
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 13, 2023