यवतमाळ : भरधाव वाहन पुलाच्या कठड्यावर आदळून पिता-पुत्रा जागीच मृत्‍यू

यवतमाळ : भरधाव वाहन पुलाच्या कठड्यावर आदळून पिता-पुत्रा जागीच मृत्‍यू
Published on
Updated on

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : नागपूरहून हैदराबादकडे भरधाव जाणारे चारचाकी वाहन पुलाच्या कठड्यावर आदळून पिता-पुत्राचा  जागीच मृत्‍यु झाला. हा अपघात पांढरकवडा तालुक्यातील धारणा गावानजीकच्या लहान पुलावर बुधवारी (दि.13) सकाळी सहाच्या दरम्यान झाला.

वाहतूक पोलीस मदत केंद्रकडून याबाबत सांगितले की, विठ्ठल जंगम श्रीनिवास (वय २०) व जंगम श्यामसुंदर श्रीनिवास (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत. ते तेलंगणातील नरसम पेठ (जि. वारंगल) येथील रहिवासी आहेत. दोघे पिता-पुत्र काल मंगळवारी गाडी क्रमांक (टीएस २४, टी ९२६३) या वाहनाने नरसम पेठ येथून मिरची भरून ती नागपूर येथे विकण्यासाठी गेले होते. त्‍यानंतर मिरची विकून नागपूरहून परत येत असताना धारणा येथील लहान पुलाच्या कठड्याला भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, वाहनातील दोघेही जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती करंजी वाहतूक पोलीस मदत केंद्राला याबाबत माहिती मिळताच त्‍यांनी घटनास्थळावर धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह वाहनातून बाहेर काढले. चालकाला झोपेची डुलकी लागल्‍याने गाडीवरील ताबा सुटल्‍याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news