ठाणे : कसारा घाट येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली
कसारा (ठाणे); पुढारी वृत्तसेवा :कसारा घाट येथे दोन दिवस सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रविवारी रात्री ११ वाजता मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट येथे दरड कोसळली. दगड व मातीचा खच रस्त्यावर आले.
अधिक वाचा –
- भुसावळ : वीजवाहिनीला धक्का लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
- पाठकबाई अक्षया देवधरचा पारंपरिक साजश्रृंगारात फोटोशूट
कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केशव नाईक, कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक संस्थेचे सदस्य शाम धुमाळ, मनोज मोरे, अक्षय राठोड, विनोद आयरे, दत्ता वाताडे, महामार्ग पोलीस दाखल झाले.
अधिक वाचा –
- संसद पावसाळी अधिवेशन : पंतप्रधान मोदी म्हणाले, लस घेऊन लोक झाले बाहुबली
- मुंबई पाऊस : ‘गोकुळ’सह ‘वारणा’ दूध वितरणाला फटका
दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन नाशिककडे जाणाऱ्या वाहणांना थांबवणयात आले. रस्त्यावरील एक लेन सुरु करण्यासाठी लहान दगडी बाजूला करून एक लेन संथ गतीने सुरु केली.
कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी केशव नाईक व महामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी अमोल वालझडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व टोल कंपनी यांच्याशी मदतीसाठी संपर्क केला.
अधिक वाचा-
- मुंबई पाऊस : ‘गोकुळ’सह ‘वारणा’ दूध वितरणाला फटका
- नार नखर्याची…भाग्यश्री मोटेने भल्याभल्यांना टाकले मागे
तब्बल दोन तासांनंतर संबंधितांनी जेसीबी घटनास्थळी पाठवला. त्या दरम्यान रात्री ११ ते १ या वेळात भर पावसात पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी कार्य केले. नाशिककडे जाणारी वाहतूक विशेषतः लहान वाहणांची वाहतूक बॅटऱ्यांच्या साहाय्याने एक लेन संथ गतीने सुरु ठेवली.
रात्री १:४० दरम्यान संबंधित न्हाई व पीक इन्फ्रा कंपनीचे कामगार आल्यानंतर मध्यरात्री २:४५ ला जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्यात आली.
सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यानंतर नाशिक मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटात काही झाडे व माती रत्यावर आली.
ओहळची वाडी जवळील वळणावर काही दरडी कोसळल्या.
दैव बालवत्तर…..
दरम्यान रविवार असल्याने कसारा मुंबई नाशिक महामार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
जेव्हा घाटात महाकाय दरड कोसळली. त्या दरम्यान मुसळधार पाऊस होता. त्यामुळे अनेक लहान वाहने घाटाखाली थांबून होते.
जर पावसाचा जोर नसता अन् लहान वाहने सुरु असती तर मोठ्या दरडी खाली एखादे वाहन गेले असते. पण, केवळ दैव बालवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला.
रविवारी रात्रीपासून ते आज सकाळपर्यंत मुंबई नाशिक महामार्गांवर दरडी कोसळत होत्या. आज सकाळी मध्य रेल्वेच्या कसारा इगतपुरी रेल्वे मार्गांवर सकाळी ६ वाजता किलो मीटर क्रमांक १२२/३८ वर दरडी, झाडे व मातीचा खच रेल्वे ट्रॅकवर कोसळला.
त्यामुळे मध्ये रेल्वेची मुंबईहून नाशिक दिशेकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. रेल्वे ट्रॅकवरील खच काढण्यास उशीर होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
अधिक वाचा-
- माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यांतील चार आरोपी पळाले
- गोवा : जोरदार पावसाने कुशावती नदिला पूर
- कोल्हापूर : सर्व दुकाने आजपासून सुरू
पाहा व्हिडिओ – खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!