Pandharpur Accident : कोल्हापूरच्या ७ वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू, पंढरपूरला जाताना भरधाव कारने उडवले | पुढारी

Pandharpur Accident : कोल्हापूरच्या ७ वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू, पंढरपूरला जाताना भरधाव कारने उडवले

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कोल्हापूरच्या वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. जुनोनी (ता. सांगोला) गावाजवळ पंढरपूरला जाणा-या या दिंडीमध्ये भरधाव वेगाने कार घुसल्याने सात वारकरी जागीच ठार झाले आहेत.  सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ठार झालेले वारकरी हे जठारवाडी (जि. कोल्हापूर) या गावातील असल्याची माहिती मिळत आहेत.  (Pandharpur Accident)

कोल्हापूर जठारवाडी येथील दिंडी पंढरपूरकडे जात होती. सोमवारी सायंकाळी ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाच्या हद्दीत आली. दरम्यान जुनोनी येथे (MH 13 DE 7938) या क्रमांकाची चारचाकी ही दिंडीत घुसल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये ७ वारकऱ्यांचा यांचा मृत्यू झाला आहे. ६ जणांना उपचारासाठी पंढरपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगोला पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ठार झालेल्या व्यक्तिंमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. (Pandharpur Accident)

दुर्घटनेत जखमी व मृत जठारवाडीतील वारकऱ्यांची नावे

अपघात स्थळी सांगोला पोलीस निरीक्षकांसह त्यांचे पथक दाखल झाले असून सर्वं मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुढे हलविण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांपैकी शांताबाई शिवाजी जाधव (वय 70 वर्षे) या महिला वारकरी यांचे नाव समजू शकले आहे. अद्याप सहा मयताची ओळख पटली नसल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. तसेच या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. अनिता गोपीनाथ जगदाळे (वय ६० वर्ष), अनिता सरदार जाधव (वय 55 वर्ष), सरिता अरुण सेयेकर (वय ४५ वर्ष), शानुबाई विलास सेयेकर (वय ३५ वर्ष), सुभाष केशव काटे (वय ६७ वर्ष) अशी जखमींची नावे आहेत.

हेही वाचा

Back to top button