ऊसतोडणी मजुरासह बालकाचे अपहरण; तिघांवर गुन्हा दाखल

File photo
File photo
Published on
Updated on

विटा : ऊसतोडणी मजुरासह एका बालकाचे बीड जिल्ह्यातील व्यक्‍तींनी अपहरण केल्याची घटना 17 एप्रिल रोजी (रा. भाग्यनगर, ता. खानापूर) येथे घडली होती. याप्रकरणी मंगळवारी ऊसतोड मजूर कमल पिनू माळी (मूळ रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, जि. अहमदनगर, सध्या रा. भाग्यनगर, ता. खानापूर) यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे.

अनिल सहदेव सूर्यवंशी (वय 20) व विजय पिनू माळी (12) अशी अपहरण झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी हणमंत बापूराव बावळे, कल्याण बापूराव बावळे, बापूराव बावळे (तिघेही जि. बीड) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. कमल माळी या ऊसतोड मजूर आहेत. त्या सध्या भाग्यनगर येथे ऊसतोडणीसाठी आल्या आहेत. 17 एप्रिलला त्यांचा मुलगा विजय आणि भाचा अनिल माळी हे राहत असलेल्या झोपडीपासून थोड्या अंतरावर ट्रॅक्टर जोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयितांनी दोघांचे अपहरण केले आहे.

हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news