

पुणे: राज्यातील डाळिंबाचा हंगाम संपल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात कर्नाटक, गुजरात येथून डाळिंबाची आवक होत आहे. परराज्यातील डाळिंब राज्यातील डाळिंबाच्या तुलनेत दर्जेदार नाहीत. मात्र, बाजारात होत असेलल्या मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने या डाळिंबालाही चांगले दर मिळत आहेत.
पुढील काही दिवस परराज्यांतील डाळिंबावर पुणेकरांची मदार राहणार आहे. घाऊक बाजारात डाळिंबाच्या किलोला 10 ते 280 रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात 250 ते 350 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
राज्यभरात वाढलेल्या थंडीच्या कडाक्याचा परिणाम फळांच्या उत्पादनावर होत आहे. थंडीमुळे उत्पादन रोडावल्याने बहुतांश फळांची आवक घटली आहे. मागणी जास्त असल्याने पपईच्या भावात किलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे. तर, मागणीअभावी खरबूज दरात घट झाली आहे. उर्वरित बहुतांश फळांची आवक-जावक कायम असल्याने दर टिकून आहेत.
गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 21) मोसंबी 40 ते 50 टन, संत्रा 15 ते 20 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबू सुमारे सातशे ते एक हजार गोणी, कलिंगड 8 ते 10 टेम्पो, खरबूज 8 ते 10 टेम्पो, चिकू दोन हजार गोणी, पेरू 800 क्रेट, अननस 7 ट्रक, बोरे 350 ते 400 पोती तर गोल्डन सीताफळाची 10 ते 60 टन इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 200-450, मोसंबी : (3 डझन) : 200-350, (4 डझन) : 120-200, संत्रा : (10 किलो) : 300-1100, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 100-280, आरक्ता : 10-70, गणेश : 10-40, कलिंगड : 12-20, खरबूज : 12-30, पपई : 12-25, चिकू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 400-600, अननस (1 डझन) : 100-600, गोल्डन सीताफळ (1 किलो) : 10-60, बोरे (10 किलो) : चमेली 320-370, चेकनट 600-650, उमराण 120-150, चण्यामण्या 800- 900.