Maharashtra Sahitya Parishad Election Result: महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक निकाल आज; कोणाच्या हाती जाणार सत्ता?

परिवर्तन उत्कर्ष आघाडी की साहित्य संवर्धन आघाडी; साहित्य वर्तुळाचे लक्ष मतमोजणीकडे
Maharashtra Sahitya Parishad
Maharashtra Sahitya Parishad Pudhari
Published on
Updated on

पुणे: साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. साहित्य परिषदेवर विद्यमानच, की नव्या चेहेऱ्यांना संधी मिळणार? याबाबतचे चित्र आज म्हणजेच रविवारी (दि.15) स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Sahitya Parishad
Census 2027 Self Enumeration: जनगणना 2027 साठी मोबाईलवर स्वगणना; 1 ते 15 मेदरम्यान संधी

परिषदेच्या 2026 ते 2031 साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीस टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या वास्तूत सकाळी साडेआठ वाजता सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपासून विद्यमान पदाधिकाऱ्यांकडे परिषदेचा कारभार असल्याने यावेळी सत्तापालट होणार, की विद्यमान गटच पुन्हा सत्तेत येणार, याबाबत साहित्य क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Maharashtra Sahitya Parishad
Egg Price Fall Poultry Industry: निर्यात घटल्याने अंड्यांचे दर घसरले; पोल्ट्री उद्योग अडचणीत

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यासह अकरा जिल्ह्यांत ‌‘मसाप‌’चे 16 हजार 607 मतदार आहेत. सध्याच्या पदाधिकाऱ्यांचे ‌‘परिवर्तन उत्कर्ष आघाडी‌’ आणि ‌‘साहित्य संवर्धन आघाडी‌’ या दोन आघाड्यांमध्ये चुरस आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप, मतदार यादीतील दुबार तसेच निधन झालेल्या व्यक्तींच्या मतदार यादीत असलेल्या नावांबाबतच्या तक्रारी, मतपत्रिका घरपोच न पोहोचल्याने झालेले दुबार मतदान यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आहे..

Maharashtra Sahitya Parishad
Pune Municipal Health Budget: महापालिकेच्या आरोग्य बजेटचा मोठा हिस्सा 52 हजार कुटुंबांवर खर्च

निवडणुकीचा निकाल रविवारी (दि. 15) जाहीर होणार असून, परिवर्तन उत्कर्ष आघाडी येणार की साहित्य संवर्धन आघाडी येणार की संमिश्र निकाल लागणार, याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या मतमोजणीनंतरच्या निकालात कोणाचे पारडे जड राहणार, याबाबतची सर्वांना उत्सुकता आहे.

Maharashtra Sahitya Parishad
Rajgad Forest Wildlife Water Crisis: राजगड वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे; वन्यजीवांवर पाण्याचे संकट

दरम्यान, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी 2021 मध्ये कोरोनाचे कारण देऊन सर्वसाधारण सभेत निवडणुकीऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ घेतली. यापूर्वी साहित्य परिषदेची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. मुदतवाढीमुळे विद्यमान कार्यकारिणीकडे दहा वर्षे परिषदेच्या कारभाराची सूत्रे होती. आता साहित्य परिषदेवर पुनश्च वर्चस्व सिद्ध करण्यात परिवर्तन उत्कर्ष आघाडी यशस्वी होते की साहित्य संवर्धन आघाडीच्या माध्यमातून सत्तापालट होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news