आशीष देशमुख
पुणे : अतिवृष्टी, पूर, थंडी, उष्णता यांच्या लाटांसह वीज कोसळणे, हिमवर्षाव, धुळीचे वादळ असे 13 धोके दर्शवणारे देशाचे हवामान अॅटलास पुणे वेधशाळेच्या शास्त्रज्ञांनी तयार केले असून ते पुणे वेधशाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे.
दुष्काळी धोक्यात देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशनंतर तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे.
यात तेरा धोक्यांचा अंदाज देणारी अॅटलासची वेब आवृत्ती तयार झाली आहे. यात थंडी, उष्णता, पूर, हिमवर्षाव, धुळीचे वादळ, गारा, वादळ, गडगडाट, धुके, जोरदार वारे, अतिवृष्टी, चक्रीवादळ, भूस्खलन, मालमत्तेचे नुकसान, उपजीविका आणि सेवांचे नुकसान, आर्थिक नुकसान किती होऊ शकते याचा आढावा घेतला आहे. त्याची भौगोलिक नकाशासह माहिती दिली आहे. यासाठी जीआयएस प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. ुुु.ळार्विीपश.र्सेीं.ळप/हरूरीवरींश्ररी या संकेतस्थळावर हा वेब अॅटलास उपलब्ध आहे.
देशात 27 जिल्ह्यांतील 32 टक्के लोकांना दुष्काळाचा धोका आहे. मध्य प्रदेशातील 19 जिल्हे, उत्तर प्रदेश 15, गुजरात 14, कर्नाटक 14, महाराष्ट्र 12, राजस्थान 12, बिहार 11, तेलंगणा 10, दिल्ली 9, ओडिशा 8, झारखंड 9, आंध— प्रदेश 6, आसाम 6 तर केरळ 6 जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत.