बारामतीचा जिरायती भाग दुष्काळाच्या छायेत

बारामतीचा जिरायती भाग दुष्काळाच्या छायेत
Published on
Updated on

उंडवडी सुपे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : चालू वर्षी जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महत्त्वाचे म्हणजे बारामतीचा जिरायती भाग पावसाअभावी दुष्काळाच्या छायेत आहे. या भागातील शेतकऱ्यांना मोठी चिंता लागली आहे. बारामती तालुक्यासह जिरायती भागातील शेतकरी पाऊस पडेल या आशेवर बसला आहे. परंतु दिवसेंदिवस दिवस पाऊस लांबत चालल्याने शेतीसह सर्व उद्योगधंद्यांवर परिणाम जाणवत आहे.

सध्या विहिरी, नाले कोरडेठाक पडल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला आहे. जिरायती भागातील शेतकरी जानाई-शिरसाई कालव्यावर अवलंबून असून, उंडवडी, सुपे परिसरात पाण्याची परिस्थिती बिकट असून, यंदा दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरसाई कालव्याला आवर्तन सोडावे, अशी मागणी येथील शेतकरी गणेश भगत यांनी केली आहे.

शिरसाई कालव्याला खडकवासला धरणातून आवर्तन येते. परंतु सध्या धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने कालव्याला आवर्तन सुटणे अवघड आहे. खडकवासला धरण 80 टक्के भरल्यानंतर आवर्तन सुटेल. जर पाऊस जास्तच लांबला तर केवळ पिण्यासाठी पाणी सुटू शकते.

-अमोल शिंदे, पाटबंधारे विभाग

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news