

कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. त्याबरोबर नवीन कंपनीही आली पाहिजे, त्यादृष्टीने सरकार, लोकप्रतिनिधी व कामगार यांनी संयम बाळगून लढा देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावर सकारात्मक तोडगा काढतील.– श्रीरंग बारणे, खासदारकामगारांच्या प्रमुख मागण्यांसह जनरल मोटर्स कंपनीने केलेल्या फसवणुकीचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. मुलांच्या शाळेची फी भरणे, बँक कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले आहे. अशा स्थितीत संबंधित शाळा, बँका यांच्याकडून कुठलाही त्रास होऊ नये यासाठीही सरकारने सहकार्य करावे.– संजय भेगडे, माजी राज्यमंत्री