वास्तविक पाहता वाघांची संख्या वाढविण्याच्या द़ृष्टीने सरकारने जे प्रयत्न केले त्याच धर्तीवर सिंहांची संख्या वाढविणे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. केवळ गीरच्या जंगलात सिंहाचे वास्तव्य असून, मध्य प्रदेशमधील जंगलात हलविण्याचा आणि संख्या वाढविण्याबाबत निर्णय झाला होता. परंतु, तो प्रस्ताव बारगळला आहे. शासनाने शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने मध्य प्रदेशबरोबरच राज्यातील इतर जंगलांमध्येही सिंहाची संख्या वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे.– अनुज खरे, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळ