संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी प्रस्थान | पुढारी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी प्रस्थान

आळंदी; पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आषाढी पायी वारीसाठी रविवारी (दि. 11) प्रस्थान होणार असून, यासाठी प्रशासनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रशासन सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. राज्यभरातील वारकरी, दिंड्या आळंदीच्या वाटेवर आहेत. आळंदीतून माउलींच्या पालखीसोबत त्यांचा पंढरीचा प्रवास असणार आहे. रविवारी (दि. 11) सायंकाळी 4 वाजता
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवेल. रात्री आळंदीतच आजोळघरी गांधीवाडा दर्शनबारी मंडपात मुक्कामी राहील.

हेही वाचा

दारूमुळे संसार उघड्यावर आले हो ! दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांना आर्जव

नाशिक : कपडे धुलाईत ६७ लाखांचा गैरव्यवहार, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धागेदोरे?

डॉ. प्रदीप कुरुलकरची हेरगिरी : एटीएस अडकली मोबाईल लॉकमध्ये !

Back to top button