तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे या मागणीसाठी यशवंत ब्रिगेडकडून धरणे आंदोलन करण्यात आले. पडळकर म्हणाले, 'रयत शिक्षण संस्थेने वाफगावच्या किल्ल्याचा ताबा सोडावा, अन्यथा आम्ही तो किल्ला ताब्यात घेणार. पवार जेजुरीत काही संबंध नसताना पुतळ्याच्या उद्घाटनाला गेले. सांगलीत उद्घाटन केले, तसे या वाफगावच्या किल्ल्याबाबत का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आम्ही आता चर्चा करणार नाही.