सविस्तर वृत्त असे की, कळवण तालुक्यातील नवीबेज शिवारातील शेतकरी सचिन रामचंद्र रौंदळ गट नं १९०/२ यांच्या पोल्ट्रीफार्मच्या पाण्याच्या टाकीत रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने ४८८० पक्षी (कोंबड्यांना) विषबाधा झाली. त्यापैकी ४०० मयत काेंबड्या झाल्याने कोंबडी पालनकर्त्याचे जवळपास एक लाखा रुपयाचे नुकसान झाले आहे. सचिन रौंदळ कुक्कुटपालन व्यवसाया बरोबरच शेती व्यवसाय करून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गट नं. 190/2 मध्ये सन 2005 पासून करार पध्दतीने दोन जणांच्या नावे त्यांनी पोल्ट्रीफॉर्म टाकले. सध्या दोन्ही पोल्ट्रीफॉर्ममध्ये एका खाजगी कंपनीकडून ४८८० हजार पक्ष्यांचे पालनपोषण सुरु होते. मात्र रात्रीच्या वेळी संशयित अज्ञाताने पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकून ४०० कोंबड्या मेल्या आहेत. एक एक सेकंदाला एक कोंबडी मृत्यूमुखी पडत आहेत. तर बाकीचे पक्षी (कोंबडी) अस्वस्थ आहेत. कोंबड्याच्या तोंडातून पांढरा फेस येत असल्याने या कोंबड्या देखील मृत होण्याची शक्यता आहे. याबाबत पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास सुरु आहे.