नंदुरबार : बोली भाषेत संवाद साधत आदिवासी विकासमंत्री यांच्या हस्ते वसतीगृहाचे लोकार्पण

नंदुरबार: शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या चार इमारतींचे लोकार्पण करताना आदिवासी विकास मंत्री मंत्री डॉ. विजयकुमार गावित. (छाया: योगेंद्र जोशी)
नंदुरबार: शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या चार इमारतींचे लोकार्पण करताना आदिवासी विकास मंत्री मंत्री डॉ. विजयकुमार गावित. (छाया: योगेंद्र जोशी)
Published on
Updated on

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे आणि बोली भाषा हे त्याचं सशक्त माध्यम आहे. बोली भाषा जेव्हा शिक्षणाचे आणि संवादाचे सशक्त माध्यम होते तेव्हा किती परिणाम साधू शकतो याची प्रचिती आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांच्या बोली भाषेतून संवाद साधला तेव्हा आली. पालकमंत्री यांनी बोली भाषेतील या संवादाने उपस्थित, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांची मने जिंकून घेतली.

संवाद साधण्याचे निमित्त होते नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कोठली आश्रमशाळेच्या मुलींच्या सर्व सोईयुक्त अशा भव्य वसतीगृहांच्या ४ इमारतींच्या उद्घाटनाचे. आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे उभारण्यात आलेल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या चार इमारतींचे लोकार्पण आदिवासी विकास मंत्री मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शनिवार, दि.4 रोजी झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, माजी आमदार शरद गावित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रकाश गावीत जि.प.सदस्य राजश्री गावित, नटावद गावाच्या सरपंच जयश्री गावित सर्व गावाचे सरपंच उपस्थित होते. ग्रामस्थांनी देखील कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सोपे व्हावे, त्यासाठी राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी बोलीभाषेत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आवर्जून सांगिताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले. पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या आदिवासी मुलींसाठी सर्व सोईयुक्त चार भव्य इमारती असलेली ही राज्यातील पहिली आय. एस. ओ. नामांकित आश्रमशाळा आहे. तर आश्रमशाळेत ५३३ मुलींना प्रवेश देण्यात आला आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेत नंदुरबार जिल्ह्यातल्या सात गावातल्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजनही डॉ. गावित यांनी यावेळी केले. नटावद धरणातून गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी १८ कोटींहून अधिक रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत शुध्द पाणी पोहोचवले जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित यांनीही मनोगत व्यक्त केले.

या ठिकाणी भुमीपूजन, पायाभरणी व उद्घाटन
यावेळी उमर्दे, वेळावद, लोय मोठे पिंपळेद, रतनपाडा, बर्डिपाडा, कोठली, धानोरा येथील पाणीपुरवठा योजनांचे भुमिपूजन, वाघाळा आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभ व कोठली येथील मुलींच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news