कांदापिकावर उन्हाचा परिणाम | पुढारी

कांदापिकावर उन्हाचा परिणाम

नाशिक (पालखेड मिरचीचे)  : पुढारी वृत्तसेवा
यंदा मार्चपासून उन्हाची तीव्रता अधिक होती मध्यंतरी हवामान विभागाने ही उन्हाची लाट असल्याने काळजी घेण्याचे आव्हान केले होते. या तीव्रता उन्हाचा कांदा पिकांवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. उन्हामुळे कांदा दहा ते पंधरा दिवस आधीच कांद्याची पात वाळून काढायला आला आणि कांदा पोसण्यावरही परिणाम झाल्याचा काही शेतकर्‍यांना अनुभव आला आहे. त्यामुळे यंदा उत्पादन कमी होणार असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

नगर, नाशिक, बीड, सोलापूर, औरंगाबाद, पुणे आणि अन्य काही भागांत कांद्याची मोठ्या प्रमाणात यंदा लागवड झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा 40 ते 50 टक्के कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. बियाण्यात फसवणूक व त्यामुळे झालेले नुकसान, दरात चढ-उतार यांसारख्या अडचणी झालेल्या असतानाही नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे दोन लाख हेक्टरच्या आसपास लागवड झाली आहे.

राज्यात मार्चपासून उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पाण्याचे नियोजनदेखील कोलमडल्याने नेहमीपेक्षा जास्त पाणी द्यावे लागले पाणी कमी पडल्यास कांदापात वाळून नुकसान होऊ शकते. ज्या शेतकर्‍यांनी ही काळजी घेतली त्यांच्या कांद्यावर परिणाम होत नाही.

कांदा पोसण्यावर झाला परिणाम
मार्च महिन्यात उन्हाची लाट होती. अजूनही उन्हाचा तडाखा आहे. त्याचा परिणाम म्हणून आपोआप कांदापात वाळली आणि नेहमीपेक्षा पंधरा दिवस आधीच कांदा काढणीला काढणीला आला. त्यामुळे कांदा पोसण्यावर परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात घट होणार असे दिसत आहे.
– सचिन ढमे, शेतकरी

हेही वाचा :

Back to top button