कोल्हापूरकरांनी विरोधकांचे भोंगे खाली उतरवलेत, आता हिमालयात कोण जातं ते पाहूच : संजय राऊत | पुढारी

कोल्हापूरकरांनी विरोधकांचे भोंगे खाली उतरवलेत, आता हिमालयात कोण जातं ते पाहूच : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरकरांनी विरोधकांचे भोंगे खाली उतरवलेत. त्यामुळे आता हिमालयात कोण जाते ते बघुयात. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत लगावला. तसेच कोल्हापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. कोल्हापूरचा निकाल हा आमच्या विजयाचा दाखला आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

शिवसेनाप्रमुखांची भ्रष्ट कॅापी करण्याचे काम करण्यात येत आहे. असे नाव न घेता राज ठाकरेंवर संजय राऊत यांनी यावेळी टीका केली. निवडणुका असलेल्या ठिकाणी दंगा करण्याचं काम हे करत आहेत. त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन हनुमान चालीसा पठण करून दाखवावी. असे म्हणत त्यांनी विरोधकांवर आरोप केला. यारम्यान त्यांनी हनुमान चालिसाचे  पठणदेखील करून दाखवले.

लोकांना भोंगे वाटायचे, त्यासाठी काही लोकांना सुपाऱ्या दिल्या गेल्या. ओवेसींना बोलावून दंगली घडविण्याचा कट रचलेला आहे असा आरोप त्यांनी यावेळी मशिदीवरील भोंग्याबाबत बोलत असताना केला. भाड्यानं हिंदूत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. हिजाब प्रकरणानंतर आता हनुमान प्रकरणावरून राजकारण सुरू केलं आहे, असलं घाणेरडं राजकारण सुरू केलं आहे. याविरोधात मविआचे तिन्ही पक्ष हे एकत्र येऊन काम करत आहेत. उद्धव ठाकरे हे सगळ्यांना पुरून उरतील. जनता देखील हे सगळं षडयंत्र उधळून लावेल. असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं.

पुढे त्यांनी नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेबाबतही आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या नेत्याला धोका नाही. केंद्र सरकार काही नेत्यांच्या सुरक्षेसाठी पैसे वाया घालवत आहेत.

दरम्यान, त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंना अयोध्येला घेऊन जाणार आहे. अयोध्या हे आमचं घर आहे. आयएनएस विक्रात करिता एक मोहीम चालवली गेली. त्या मोहिमेत सर्वजण होते. आयएनएस विक्रांत ही देशाची संपत्ती आहे. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

Back to top button