जळगाव : मुलाच्या आत्महत्येनंतर तणावात असलेल्या वडिलांचीही गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

जळगाव : मुलाच्या आत्महत्येनंतर तणावात असलेल्या वडिलांचीही गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाच्या ठिकाणी प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रमेश सुकलाल राजपूत (४८. रा. कांचननगर) हे बुधवारी (दि.२) नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेले असता बरे वाटत नसल्याचे सांगून दुकानाच्या आत गेले. इतर कर्मचारी बारदाण शिलाई करीत होते. रमेश राजपूत हे बऱ्याच वेळेपासून बाहेर आले नसल्याने कर्मचाऱ्यांनी आतमध्ये बघितले असता रमेश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी मृत घोषित केले.

दि. १४ जानेवारी नुकतेच रमेश राजपूत यांचा मुलगा यश राजपूत यानेदेखील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. तेव्हापासून यशचे वडील मृत रमेश राजपूत हे तणावात असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button