गुलाबरावांच्या नावाची सुरुवातच खराब, त्यांनी नाव लावूच नये : एकनाथ खडसे | पुढारी

गुलाबरावांच्या नावाची सुरुवातच खराब, त्यांनी नाव लावूच नये : एकनाथ खडसे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : जो शक्तीवान असतो त्याच्याविरुद्ध सगळेजण एकत्र येतात, कारण त्याला एकटं कोणी हरवू शकत नाही. कॉंग्रेस, भाजप किंवा शिवसेना यापैकी कोणीही एकटं राष्ट्रवादीला हरवू शकणार नाही. राष्ट्रवादीला हरवण्यासाठी तिघांना एकत्र यावं लागेल. त्यामुळे तिघेही एक व्हा आणि मग नाथाभाऊला हरवा असे एकनाथ खडसे म्हणाले. पण, मतदार नाथाभाऊ ला हरवू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

येत्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरणगाव येथे (दि. 21) कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात एकनाथराव खडसे बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर त्यांनी चांगलाच निशाणा साधला. गुलाबराव पाटलांच्या, नाथाभाऊंना चारी मुंड्या चीत केल्याशिवाय गुलाबराव नाव लावणार नाही या विधानावर बोलताना खडसे म्हणाले, तुम्ही तुमचे नाव लावूच नका, कारण तुमच्या नावाची सुरुवातच खराब आहे असा सल्ला त्यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना यावेळी दिला.

खडसे पुढे म्हणाले, छुपी युती करुन मला हरवण्यापेक्षा एकट्याने लढून हरवून दाखवा असे आव्हान त्यांनी यावेळी केले. काय दाखवायचे ते निवडणुकीत दाखवा. राष्ट्रवादी विरुद्ध सगळे असे सध्याचे जिल्ह्यात वातावरण असल्याचे खडसे म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button