पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत ३०० मीमी पाऊस झाला आहे. कमी वेळेत विक्रमी पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचले आहे. याचा रेल्वे सेवेला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. दरम्यान, पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेक पंप सुरू केले आहेत. पाण्याचा निचरा झाल्याने रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.८) पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईत ३०० मीमी पाऊस झाला आहे.
मुंबईत जास्त पाऊस पडल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला
रेल्वे, महापालिका, राज्य आपत्ती विभागाला सज्ज राहण्य़ाच्या सुचना
मुंबईत जास्त पाऊस पडल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. रेल्वे लाईन खाली असलेल्या मायक्रायटनाचा फायदा होत आहे. एनडीआरएफच्या प्रमुखांना सर्व व्यवस्था करण्यास सांगितले आहे. प्रसंगी सुरक्षा दलांची मदत घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. रेल्वे, महापालिका, राज्य आपत्ती विभागाला सज्ज राहण्य़ाच्या सुचना दिल्या आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केले आहे.