ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय मांडणार : चंद्रकांत पाटील
पुढारी ऑनलाईन डेस्क
निवडणुकांचा खेळखंडोबा झालाय. राज्य विधिमंडळाला राज्यपालांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. होकार की आडकाठी, हे लवकरचं समजेल. विधिमंडळात मोठ्या घडामोडीचे संकेत आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय मांडणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा सस्पेन्स अजुनही कायम आहे. राज्यपालांच्या अधिकाराबात मी बोलणार नाही. राज्यात २ वर्षात अनेक गोंधळाचे प्रसंग घडले. अध्यक्ष निवडणुकीबाबत सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडी आल्यापासून गोंधळचं सुरू आहे. झालेल्या गोंधळाची यादीही मोठी आहे. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.