Supriya Sule | शेतकऱ्यांच्यावेळी दिल्लीचं तिकीट मिळत नाही का? सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल | पुढारी

Supriya Sule | शेतकऱ्यांच्यावेळी दिल्लीचं तिकीट मिळत नाही का? सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : “पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.” अशी पोस्ट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी सरकारला जाब विचारला आहे की, शेतकऱ्यांच्यावेळी दिल्लीचं तिकीट मिळत नाही का? (Supriya Sule)

Supriya Sule : पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट…

राज्यात काही ठिकाणी दुष्काळीची परिस्थिती आहे तर  काही ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभुमीवर सुप्रिया सुळे यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे अतिशय अडचणीत सापडला आहे. अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन उभा करायला हवे. परंतु सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची कसलीही काळजी नाही असे स्पष्ट दिसते. पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. जेव्हा या सरकारमधील नेत्यांची वैयक्तिक कामे असतात तेव्हा विनाविलंब ते दिल्लीला पळतात मग शेतकऱ्यांना जेंव्हा गरज आहे तेंव्हा यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का? महाराष्ट्र सरकारने दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत आणली पाहिजे व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे.”

हेही वाचा 

Back to top button