एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर जल्लाेष
पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल साडेपाच महिन्यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा (ST employees) तिढा आज अखेर सुटला. एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. कर्मचाऱ्यांवर कारवाई नको, असे सांगत त्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. उच्च न्यायालयाचा हा निर्णयानंतर मुंबईतील आझाद मैदानावर आंदाेलन करणार्या एसटी कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी काही कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले
ST employees : आमचा विजय झाला
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णयावर एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले अखेर आमचा विजय झाला आहे. गेली अनेक दिवस चालेल्या आंदाेलनास अखेर यश मिळाले. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, अशी भावना काही कर्मचार्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचलंत का?
- NEET Exam 2022 : १७ जुलै राेजी हाेणार NEET परीक्षा, ६ मेपर्यंत करता येणार अर्ज
- …तर श्रीलंका उद्ध्वस्त होईल, सध्यस्थिती भयावह; माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांच्याकडून चिंता व्यक्त
- संजय राऊत म्हणाले, ‘विक्रांत’च्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना शिवसेना समुद्रात बुडवणार
- नाशिक : मृत प्रेस कामगारांच्या वारसांना सेवाज्येष्ठतेनुसार मिळणार नोकरी
ब्रेकिंग! एसटी संपाचा तिढा अखेर सुटला, कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश https://t.co/2a0Hz2rH6X #pudharionline #pudharinews #STstrike
— Pudhari (@pudharionline) April 7, 2022