महाराष्ट्र अर्थसंकल्प : कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी विशेष योजना
मुंबई : पुढारी ऑनलाईन
महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ज्या महिला कोविड काळात विधवा झाल्या आहेत, त्यांच्यासाठी सरकारने विशेष योजना जाहीर केलीय.
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेची घोषणा करण्यात आलीय. या काळात अनेक महिलांनी आपल्या पतीला गमावलं आहे. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगारासाठी सरकार भांडवल उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
कृषी योजनांमध्ये तरतूद
महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये ५० टक्के राखीव तरतूद करण्यात आलीय. याआधी महिला शेतकऱ्यांसाठीची कृषी योजनांमध्ये राखीव असलेली तरतूद ३० टक्के आहे. आता ती वाढवून ५० टक्के करण्यात आलीय तसेच हे वर्ष महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून साजरं केलं जाणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.
- दोन वर्षानंतर होळी, धुळवडीचा फिव्हर
- पोलिसांच्या कारभारावरही तिसऱ्या डोळ्याची नजर
- तब्बल 50 वर्षांनंतर पुण्यात होणार ‘टीपी स्किम’
महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री @AjitPawarSpeaks हे राज्याचा २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करीत आहेत.#Live#MahaBudget2022#महाबजेट2022#अर्थसंकल्पीयअधिवेशन https://t.co/q4wTTCfYOk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 11, 2022