विजय वडेट्टीवार : पूरग्रस्तांना तातडीची १० हजारांची मदत

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विजय वडेट्टीवार : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ९ जिल्ह्याला पूराचा फटका बसला आहे. या पुरामुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले आहे. घरांचे, दुकानांचे व शेतकऱ्यांच्या पीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सध्या प्रशासन झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामा करत आहे. मात्र, तातडीची मदत म्हणून राज्य सरकारने जाहीर केली आहे. यात ज्या नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

त्यांना गरजेच्या वस्तू आणण्यासाठी व घरखर्चासाठी तातडीने १० हजार रुपये दिले जाणार आहेत तर ज्यांचे अन्नधान्यांचे नुकसान झाले आहे त्यांना पाच हजारांची मदत दिली जाईल अशी घोषणा मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

दुसरीकडे, १० किलो तांदुळ, १० किलो गहू, ५ किलो तुरडाळ आणि ५ लिटर केरोसन आदींचे वाटप केले जात आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आदी ९ जिल्ह्यांचे पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा प्रशासन घेत आहे.

सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार विविध भागातील नुकसानीची पाहणी करत आहेत.

संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. पंचनामे केले जात आहेत.

सध्या तातडीची मदत म्हणून १० व ५ हजार रुपयांची जाहीर केली आहे. येत्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.

पुढील दोन दिवसात राज्यातील नुकसानीचा अंदाज घेऊन मदत जाहीर केली जाणार आहे.

हे ही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news