

महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी हेरगिरी प्रकरणी भाजपला टोला लगावला. त्यांनी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटचा आधार घेत केंद्र सरकारवर निशाना साधला.
यशोमती ठाकूर 'केंद्र सरकारने फोन टॅपिंग करून हेरगिरी केल्याचा आरोप काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेत केला. मात्र याप्रकरणी कोणताही फोन टॅपिंग केला नसल्याचे वारंवार केंद्र सरकारने सांगितलं. पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणतेही फोन टॅपिंग झालं नसल्याचा दावा केंद्राने केला.' असे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की , 'पण भाजपाचेच नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट ट्विट करत भाजपाची आणि केंद्र सरकारची पोलखोल केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता सत्य लपवण्याऐवजी ते उघड करावे.'
'जर लपवण्यासारखं काही नाही तर मोदी यांनी इस्त्राईलला विचारून पेगासस प्रकरणी कोणाला पैसे दिले याची माहिती घ्यावी आणि ती उघड करावी.
असं आव्हानच सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी ही मागणी केल्याने केंद्र सरकार लपवाछपवी करते आहे हे स्पष्ट झाले. सुब्रमण्यम स्वामी यांच्याच मागणीचा भाजपाने तातडीने विचार करून देशासमोर सत्य उघड करावे.
स्वामी यांनी मागणी केल्याने आता सुंठीवाचून खोकला गेला. असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी भाजपला चिमटा काढला.
जर काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी याबाबत मागणी केली असती तर त्यांच्यावर चॅट राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करायला सरकारने मागेपुढे पाहिले नसते असा टोला महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी लगावला.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : पंकजा मुंडे वडील गोपिनाथ मुंडेंबद्दल काय म्हणाल्या?