जालना : बदलत्या राजकारणाचा निवडणुकीवर परिणाम

जालना : बदलत्या राजकारणाचा निवडणुकीवर परिणाम
Published on
Updated on

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : शहरात पुढील दोन महिन्यांत नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. यासाठी मोर्चेबांधणीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली होती. मात्र, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने बदलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद जिल्ह्यासह तालुक्यातील जि.प., पं.स. व नगर परिषद निवडणुकीवर होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निवडणूक मोर्चेबांधणीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील राजकारणावर पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना फार महत्त्व आहे. त्यामुळे खासदार, आमदार व स्थानिक नेते यात अधिक रुची घेतात. भोकरदन नगर परिषदेच्या पदाधिकार्‍यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 15 फेब्रुवारीला पूर्ण झाला. त्यानंतर नगर परिषदेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली, या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रक्रियेला प्रशासनाने सुरुवात केली आहे.

आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नगर परिषद निवडणूक झाल्यास त्याचा या निवडणुकांवर काय परिणाम होणार आहे. जिल्ह्याचे भाजपचे प्रभावी नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व त्यांचे पुत्र स्थानिक आमदार संतोष दानवे यांना नगरपालिकेत अलीकडच्या काळात एकहाती सत्ता मिळवता आलेली नाही. सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या ताब्यात ही नगरपालिका आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा देखील प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. एकूणच येणारी नगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष प्रतिष्ठेची करेल, असा अंदाज आहे.

नगराध्यक्षाचा मान कोणत्या पक्षाला मिळणार यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळण्यासाठी शक्यता आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी या ठिकाणी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, संभाव्य उमेदवारांची यादीसुध्दा केली आहे. भावी उमेदवार गाठीभेठी घेत होते. भोकरदन पालिकेची निवडणूक यंदा अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

सत्र थंडावले जिल्ह्यात आगामी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे, सभा, बैठकांचे सत्र सुरू झाले होते. त्यामुळे नगर परिषद निवडणुकांचे पडघम वाजल्याचे चित्र होते. मात्र, मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सभा, बैठकांचे सत्र बंद झाले होते आणि सर्वांनीच वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news