गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याने यंदाच्या वर्षी मृगात पेरण्या होणार असा अंदाज बांधला होता. मात्र, मृग नक्षत्राला सुरुवात होऊन दहा बारा दिवस उलटूनही वरुणराजा बरसला नसल्याने पेरणी बरोबर चारा टंचाईच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत.
खरिप हंगामाची मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास पीक चांगले येते येते असे शेतकऱ्यांचे गणित आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेत नांगरणी, वखरणी करुन पेरणी योग्य केले आहे. वेळेवर पेरणी होईल या आशेवर शेतकऱ्यांनी उधारीत उसनवारी करून खता बी बियाणांची जुळवाजुळव करून खरिपाच्या हंगामात पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचन व्यवस्था आहे. अशा मोजक्याच शेतकऱ्यांनी हळद लागवड केली आहे. गोरेगावसह परिसरात सर्वाधिक सोयाबीन पिकाला पसंती दिली जाते. शेतकऱ्यांची सर्व दारोमदार सोयाबीन पिकावर अवलंबून असते. मात्र, खरिप हंगामाची पेरणी ला उशीर होत असल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घसरण होणार असल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने मृगात खरिपाच्या पेरण्या होतील असे अंदाज बांधले होते.
मात्र. मृग नक्षत्र कोरडे ठाक गेल्याने मृगातील वाहन हत्ती रुसला असल्याने यात शेतकरी फसला आहे. वेळेवर पाऊस नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. पाऊस नसल्याने जनावरांना लागणारा चारा टंचाईच्या झळा बसत आहे. जनावरांना दहा-पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. यामुळे शेतकऱ्यांना जनावरे पाळताना जिकिरीचं बनले आहे.
हेही वाचा;